Monday, September 26, 2011

क्रिकेटप्रेमी सचिन भक्तांनो----------------
माझ्या लाडक्या क्रिकेटप्रेमी तमाम
भक्तांनो,
सप्रेम नमस्कार. वि.वि
मित्रहो आता पत्र लिहितो आहे ते खास
कारण म्हणूनच. परवा जगातील
एकेकाळचा गोलंदाज शोएब अख्तर
याच्या आत्मचरित्रावरून जो गोंधळ
तुम्ही उडवलात त्यामुळे आम्ही हे पत्र
लिहिण्यास मजबूर झालो. असो. तर
माझ्या माहितीप्रमाणे सचिन तेंडुलकर
हा मला फलंदाजी करताना भीत
होता या त्याच्या वाक्यावरुन
तुमची तळपायाची आग
मस्तकाला गेली.सार्या देशात एकाच गहजब
तुम्ही केलेत.कोण म्हणाले शोएबने
माफी मागावी.कोणी त्याच्या त्या तथाकथित
आत्मचरित्र प्रकाशनाचा कार्यक्रम उधळणार
होते,तर कोणी विषारी भाषेत
शोएबचा उद्धार करून आपले सचिनप्रेम दाखवत
होते.
मित्रांनो आपल्या देशात आजपर्यंत
धर्माच्या ,जातीच्या,
भावना दुखावायच्या पण इथून पुढे
क्रीडप्रेमींच्याही भावना दुखवणार आहेत हे
तुम्ही जगाला समजावून दिलेत.
मित्रांनो क्रिकेट हा खेळ आहे. या खेळत टाकले
असतील शोएबने सचिनला काही बॉल. वाटले
असेल त्याला की सचिन माझ्या गोलंदाजीवर
गडबडतोय. म्हणून त्याने लिहिले असेल त्याने
तसे,किंवा सचिनसारझ्या महान
व्यक्तिमत्वावर असले काही लिहिले
की आपोआप आपले पुस्तक बेस्ट-सेलर बनेल
म्हणूनही. पण यात तुमचे काय गेले? सचिन
मला भीत होता असे जर कोणी शोएब
त्याला म्हणत असेल तर तेवढ्याने
काही सचिनची महानता थोडीच कमी होणार
होती? ज्या सचिनबाबत तो जे
काही बोलला त्याने याबाबत ब्र
ही काढला नाही,मग तुम्ही का बरे इयटके
उतावीळ झाला?
मित्रांनो तुम्हाला भारतीय
मानसिकतेतील व्यक्तिस्तोमाचा रोग झालाय
असेच म्हणावे लागेल. सचिन क्रिकेट चांगले
खेळतो, सचिन हा नम्र आहे. सचिम
जितका चांगला क्रिकेटर आहे तितकाच
किंवा त्याहूनही श्रेष्ठ असा माणूस आहे.हे सगळे
मला मान्य आहेच. पण म्हणून तुम्ही सचिनला देव
करून टाकता ते मला पटले नाही.
मध्यंतरी द्या सचिनला भारतरत्न
असा धोशा तुम्हा मंडळींनीच काढला होता.
अरे सचिन हा खेळाडू आणि त्याचे यश हे
एखाध्या पुरस्काराच्या ही पुढे गेले आहे,हे
तुम्हाला केव्हा समजणार? पण एखाद्याला देव
केला त्याच्या भजनी लागायचे, त्याचा उदो-
उदो करायचा हा एक-कलमी कार्यक्रम
तुम्ही राबवता.
मित्रांनो मला आठवते,आम्हाला 9वी का 10
वी ला प्रा. जनार्दन वाघमारे
यांचा 'महापुरुषांचा पराभव' या नावाचा एक
पाठ होता. त्यात ते सांगतात
की महापुरुषांना जीवनात कोणाकडून पराभव
स्वीकारावा लागतो तो म्हणजे
त्यांच्या आंधळ्या अंनुयायांकडून!
आणि गेल्या 2,3 दिवसातील
घटना पहिल्या की तुम्ही सचिनचे किती आंधळे
भक्त आहात ते लक्षात येते.
आमची ज्याच्यावर निष्ठा आहे
त्याला कोणी काही म्हणायचे
नाही.आम्हाला जो खेळाडू
आवडतो त्याच्या खेळ;आवर
कोणी टीका करायची नाही. त्याच्यावर
एकधी खेळाडू व्यक्ति चांगले लिहीत असेल तर
त्याच्या आम्ही मोठ्या बातम्या करून
लावणार, पण त्याच्या खेळाच्या दर्जावर
मात्र कोणी बोलायचे नाही. एवढेच न्हावे तर
त्याचा आम्ही ठरवेल तो दर्जा सर्वांनी मान्य
करायचं ही तुमची हिटलरशाही!
मागे आण्णा हजारे यांचेही असेच भक्तगण
देशात तयार झाले होते.मी कुठेतरी वाचले
की आण्णा हजारे यांचे मध्यप्रदेशात मंदिर
बांधले जाणार आहे.,तेव्हा आता तुम्ही सचिनचे
देखील एखादे मंदिर बनवून त्याला दगड
बनवणार नाही कशावरून?
ज्या डॉन ब्र्याडमन यांनी सचिनमध्ये
स्वताला पहिले आहे
त्या सचिनला एखादा गोलंदाज
काही म्हटला म्हणून आपले सामाजिक
पर्यावरण बिघडवणे यात कोणते आले आहे
शहाणपण?
कळावे,
भुरटा.
पत्र लिहितो आहे ते खास
कारण म्हणूनच. परवा जगातील
एकेकाळचा गोलंदाज शोएब अख्तर
याच्या आत्मचरित्रावरून जो गोंधळ
तुम्ही उडवलात त्यामुळे आम्ही हे पत्र
लिहिण्यास मजबूर झालो. असो. तर
माझ्या माहितीप्रमाणे सचिन तेंडुलकर
हा मला फलंदाजी करताना भीत
होता या त्याच्या वाक्यावरुन
तुमची तळपायाची आग
मस्तकाला गेली.सार्या देशात एकाच गहजब
तुम्ही केलेत.कोण म्हणाले शोएबने
माफी मागावी.कोणी त्याच्या त्या तथाकथित
आत्मचरित्र प्रकाशनाचा कार्यक्रम उधळणार
होते,तर कोणी विषारी भाषेत
शोएबचा उद्धार करून आपले सचिनप्रेम दाखवत
होते.
मित्रांनो आपल्या देशात आजपर्यंत
धर्माच्या ,जातीच्या,
भावना दुखावायच्या पण इथून पुढे
क्रीडप्रेमींच्याही भावना दुखवणार आहेत हे
तुम्ही जगाला समजावून दिलेत.
मित्रांनो क्रिकेट हा खेळ आहे. या खेळत टाकले
असतील शोएबने सचिनला काही बॉल. वाटले
असेल त्याला की सचिन माझ्या गोलंदाजीवर
गडबडतोय. म्हणून त्याने लिहिले असेल त्याने
तसे,किंवा सचिनसारझ्या महान
व्यक्तिमत्वावर असले काही लिहिले
की आपोआप आपले पुस्तक बेस्ट-सेलर बनेल
म्हणूनही. पण यात तुमचे काय गेले? सचिन
मला भीत होता असे जर कोणी शोएब
त्याला म्हणत असेल तर तेवढ्याने
काही सचिनची महानता थोडीच कमी होणार
होती? ज्या सचिनबाबत तो जे
काही बोलला त्याने याबाबत ब्र
ही काढला नाही,मग तुम्ही का बरे इयटके
उतावीळ झाला?
मित्रांनो तुम्हाला भारतीय
मानसिकतेतील व्यक्तिस्तोमाचा रोग झालाय
असेच म्हणावे लागेल. सचिन क्रिकेट चांगले
खेळतो, सचिन हा नम्र आहे. सचिम
जितका चांगला क्रिकेटर आहे तितकाच
किंवा त्याहूनही श्रेष्ठ असा माणूस आहे.हे सगळे
मला मान्य आहेच. पण म्हणून तुम्ही सचिनला देव
करून टाकता ते मला पटले नाही.
मध्यंतरी द्या सचिनला भारतरत्न
असा धोशा तुम्हा मंडळींनीच काढला होता.
अरे सचिन हा खेळाडू आणि त्याचे यश हे
एखाध्या पुरस्काराच्या ही पुढे गेले आहे,हे
तुम्हाला केव्हा समजणार? पण एखाद्याला देव
केला त्याच्या भजनी लागायचे, त्याचा उदो-
उदो करायचा हा एक-कलमी कार्यक्रम
तुम्ही राबवता.
मित्रांनो मला आठवते,आम्हाला 9वी का 10
वी ला प्रा. जनार्दन वाघमारे
यांचा 'महापुरुषांचा पराभव' या नावाचा एक
पाठ होता. त्यात ते सांगतात
की महापुरुषांना जीवनात कोणाकडून पराभव
स्वीकारावा लागतो तो म्हणजे
त्यांच्या आंधळ्या अंनुयायांकडून!
आणि गेल्या 2,3 दिवसातील
घटना पहिल्या की तुम्ही सचिनचे किती आंधळे
भक्त आहात ते लक्षात येते.
आमची ज्याच्यावर निष्ठा आहे
त्याला कोणी काही म्हणायचे
नाही.आम्हाला जो खेळाडू
आवडतो त्याच्या खेळ;आवर
कोणी टीका करायची नाही. त्याच्यावर
एकधी खेळाडू व्यक्ति चांगले लिहीत असेल तर
त्याच्या आम्ही मोठ्या बातम्या करून
लावणार, पण त्याच्या खेळाच्या दर्जावर
मात्र कोणी बोलायचे नाही. एवढेच न्हावे तर
त्याचा आम्ही ठरवेल तो दर्जा सर्वांनी मान्य
करायचं ही तुमची हिटलरशाही!
मागे आण्णा हजारे यांचेही असेच भक्तगण
देशात तयार झाले होते.मी कुठेतरी वाचले
की आण्णा हजारे यांचे मध्यप्रदेशात मंदिर
बांधले जाणार आहे.,तेव्हा आता तुम्ही सचिनचे
देखील एखादे मंदिर बनवून त्याला दगड
बनवणार नाही कशावरून?
ज्या डॉन ब्र्याडमन यांनी सचिनमध्ये
स्वताला पहिले आहे
त्या सचिनला एखादा गोलंदाज
काही म्हटला म्हणून आपले सामाजिक
पर्यावरण बिघडवणे यात कोणते आले आहे
शहाणपण?
कळावे,
भुरटा.

No comments:

Post a Comment